भाग १९ - नालंदा
राजगिर रेल्वे स्टेशन वरून नालंदाला पोचलो, एकुणात "बिहार की ठंड" थंडी होतीच.. मला आधीच जास्त थंडी वाजते नेहमीच, त्यात ताप, अशक्तपणा त्यामुळे प्रचंड थंडी वाजत होती.. बरोबर होते तेवढे सगळे गरम कपडे अंगावर चढवूनच मी बसमधे बसले होते, बरोबरच्या कल्याणीची हालतही फार वेगळी नव्हती..ती पुण्यात MIT ला शिकणारी मुलगी.. बसमधून उतरलो खऱ्या पण नकोच वाटायला लागलं.. एकदा डॉक्टर येऊन मला सांगून गेले की, "की चलो, आप रुक गयी तो आपके साथवाली बच्ची भी रुक जायेगी|" झालं, माझा ताईमोड ऑन... लिनाने बसवून आम्हाला टपरीवर चहा पाजला, आणि शेवटी रिक्षा करून आम्ही नालंदा खंडहर पाशी पोचलो.. जेमतेम एक किलोमीटर अंतर पण चालत नको वाटलं तेव्हा. आत गेलो, वाटलं जमेल आपल्याला.. विस्तीर्ण परिसर.. प्रत्यक्षात जे उत्खननात सापडलेले अवशेष किंवा इमारती आहेत त्या बऱ्याच आत आहेत. पुरातत्त्व विभागाच्या तिकीट ऑफीसपासून देखील बरंच चालायला लागणार आहे हे लक्षात आलं आणि बाकी सगळ्यांना तुम्ही जा, आमचं आम्ही दोघी बघतो असं म्हणून मोकळं केलं.. चालायला सुरुवात केली अन् लक्षात आलं खूप चालावं लागणार.. Dr.Kurush Dalal, Direct...